' नन्या,' बाबांनी हाक मारली, 'काल रात्री या टेबलवर दोन चॉकलेटं होती. आता एक आहे. हे कसं काय झालं?'
' रात्रीच्या अंधारात मला दुसरं चॉकलेट दिसलं नसणार!!!'
...........................................................
' मिस्टर बावळे,' रागिणी टीचर बंडूच्या बाबांना म्हणाल्या, 'आज मी तुमच्या मुलाला वर्गात प्रश्न विचारला की शाहिस्तेखानाचा वध कुणी केला? तर त्यानं काय उत्तर दिलं माहितीये... तो म्हणाला, मी नाही केला मॅम!'
' असं आहे टीचर,' बंडूचे बाबा मवाळ आवाजात म्हणाले, 'माझा मुलगा जरा ढ असेल, पण खोटारडा नाही. तो म्हणतो, त्यानं नाही केला, तर त्यानं नसेल केला, माझी खात्री आहे.'
रागिणी टीचरनी कपाळावर हात मारून घेतला...
... घराकडे परतताना बंडूच्या बाबांनी बंडूला हळूच विचारलं, 'बंड्या, मला खरं खरं सांग. तू नक्की नाही केलेला ना शाहिस्तेखानाचा वध?!!'
Monday, May 14, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment